Skip to main content

कायद्याची गोष्ट : न्यायाच्या शोधात आलेला पक्षकार

एक दिवस सकाळच्या सुमारास ऑफिसमध्ये एक गृहस्थ आले. साधे कपडे, चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यांत असहाय्यता दिसत होती. थोडा वेळ शांत बसल्यानंतर त्यांनी त्यांची समस्या सांगायला सुरुवात केली.

काही वर्षांपूर्वी त्यांनी आयुष्यभराची कमाई वापरून शहराच्या बाहेर एक छोटासा प्लॉट खरेदी केला होता. त्या वेळी ती जमीन गुंठेवारी स्वरूपात होती. जमीन मालकाशी त्यांनी कायदेशीर स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर खरेदी करार केला होता. व्यवहार करताना सर्व काही व्यवस्थित झाले असे त्यांना वाटले होते. पैसे दिल्याचे पुरावेही त्यांच्या जवळ होते.

परंतु काही वर्षांनी त्यांना अचानक एक धक्का बसला. चौकशी करताना समजले की त्याच जमिनीची दुसऱ्यांदा विक्री करण्यात आली आहे आणि नवीन खरेदीदाराच्या नावावर 7/12 उताऱ्यावर नोंद देखील करण्यात आली आहे.

या गोष्टीने ते पूर्णपणे खचले होते. कारण त्यांनी आयुष्यभराची बचत त्या जमिनीत गुंतवली होती. कागदपत्रे असूनही त्यांना आपला हक्क गमावल्यासारखे वाटत होते. त्यांच्याकडील सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासल्यानंतर स्पष्ट झाले की खरेदी करार वैध होता, स्टॅम्प ड्युटी भरलेली होती आणि व्यवहाराचे पुरावे देखील स्पष्ट होते. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने त्यांची बाजू भक्कम होती. परंतु योग्य कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक होते.

यानंतर न्यायालयात विशिष्ट कामगिरीचा दावा (Suit for Specific Performance) दाखल करण्यात आला. या दाव्यामध्ये न्यायालयाला विनंती करण्यात आली की, मूळ खरेदी करारानुसार त्या व्यक्तीला जमिनीचा हक्क देण्यात यावा.

त्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. कोर्टातील अनुभव हा नेहमीच संयम आणि तयारीची परीक्षा पाहणारा असतो. प्रत्येक तारखेला काही ना काही नवे घडत असते. कधी विरोधी पक्षाकडून आक्षेप घेतले जातात, कधी कागदपत्रांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले जातात, तर कधी साक्षीदारांची उलटतपासणी केली जाते.

या प्रकरणातही विरोधी पक्षाने विविध आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असा युक्तिवाद केला की दुसरा खरेदीदार हा “बोना फाईड पर्चेसर” आहे आणि त्याला पूर्वीच्या कराराची माहिती नव्हती. परंतु न्यायालयात प्रत्येक गोष्ट केवळ बोलण्यावर चालत नाही; ती पुराव्यांवर चालते. त्यानुसार सुनावणीदरम्यान खरेदी करार, पैसे दिल्याचे पुरावे, व्यवहारातील कागदपत्रे आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. साक्षीदारांच्या जबाबांमधूनही अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या.

कोर्टातील वातावरण हे अनेकदा तणावपूर्ण असते. एका बाजूला कायद्याचे बारकावे, दुसऱ्या बाजूला पक्षकाराची आशा. अशा वेळी वकिलाची जबाबदारी केवळ कायद्याचे कलम मांडण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर सत्य आणि न्याय यांची बाजू ठामपणे मांडण्याची असते.

काही महिन्यांच्या सुनावणीनंतर अखेर निर्णयाचा दिवस आला. न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की, “पहिल्यांदा करण्यात आलेला खरेदी करार वैध आहे”. तसेच जमीन मालकाने त्याच जमिनीची दुसऱ्यांदा विक्री करणे हे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे मूळ पक्षकाराचा हक्क मान्य करण्यात आला आणि त्याच्या बाजूने आदेश देण्यात आला.

निर्णयानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. अनेक महिन्यांचा ताण, चिंता आणि अनिश्चितता यांचा शेवटी अंत झाला होता.

या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा धडा मिळतो तो म्हणजे, कायद्याची प्रक्रिया कधी कधी वेळ घेणारी असते, पण योग्य कागदपत्रे, सत्य आणि संयम असेल तर न्याय मिळण्याचा मार्ग नक्कीच खुला होतो. अनेक वेळा लोक अन्याय सहन करतात कारण त्यांना वाटते की न्याय मिळवणे अवघड आहे. पण प्रत्यक्षात कायदा हा सामान्य माणसाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीच अस्तित्वात आहे.

वकिली व्यवसायाकडे पाहताना अनेकांना तो केवळ कोर्टातील वादविवादाचा व्यवसाय वाटतो. पण प्रत्यक्षात हा व्यवसाय लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या लढ्यांशी जोडलेला असतो.

कायद्याच्या जगात प्रत्येक केस ही फक्त फाईल नसते... ती कोणाच्या तरी आयुष्याची गोष्ट असते.

ॲड. अभिषेक खोत, सांगली
मो. 9960661657

Comments

  1. वास्तव सांगणारा लेख, खुप छान.

    ReplyDelete
  2. कोर्टाच्या पायरीवरून निरपेक्ष डोळे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची तपशीलवार यादी...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज कसा भरावा? – नियम, निकष, अटी, कायदेशीर तरतुदी व संपूर्ण मार्गदर्शन… ✍️ अ‍ॅड. अभिषेक खोत, सांगली मो. 9960661657 लोकशाही व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्था या विकासाचा पाया मानल्या जातात. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरील प्रशासन थेट जनतेच्या जीवनाशी संबंधित असते. याच व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास अशा मूलभूत विषयांवर थेट निर्णय घेण्याचे अधिकार या संस्थांना असतात. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून ग्रामीण लोकशाहीचा कणा आहे. मात्र अनेक इच्छुक उमेदवार केवळ उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यामुळे किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडतात. म्हणूनच या लेखात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडणुकीचा अर्ज कसा भरावा, त्यासाठीचे नियम, निकष, अटी, कायदेशीर तरतुदी, अंतिम मुदत आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती मांडली आहे. निवडणुकीचा कायदेशीर पाया - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या भारतीय...

गृहनिर्माण सोसायटीचे व्यवस्थापन: एक ‘विश्वस्त’ म्हणून अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांची कायदेशीर जबाबदारी

एका नामांकित गृहनिर्माण सोसायटीमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि नवीन व्यवस्थापन समिती स्थापन झाली. अध्यक्ष म्हणून श्री. ‘अ’, सचिव म्हणून ‘ब’ आणि खजिनदार म्हणून ‘क’ यांनी मोठ्या उत्साहाने पदभार स्वीकारला. सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत चालले होते. सभासद समाधानी होते, कामकाज व्यवस्थित होते आणि व्यवस्थापनावर विश्वासही होता. परंतु काही काळानंतर लिफ्ट दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या रकमांचे कंत्राट एका ठराविक कंत्राटदाराला देण्यात आले. या प्रक्रियेत आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही आणि सर्वसाधारण सभेची मंजुरीही घेण्यात आली नाही. काही महिन्यांनी या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. सभासदांनी सहकार न्यायालयात दाद मागितली. चौकशीत स्पष्ट झाले की निर्णय प्रक्रिया पारदर्शक नव्हती आणि उपविधींचे उल्लंघन झाले होते. अखेरीस न्यायालयाने अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या तिघांनाही वैयक्तिक जबाबदार धरून सोसायटीचे नुकसान त्यांच्या खिशातून भरून काढण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान भरपाई न दिल्यास त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवण्याचेही आदेश दिले. ही घटना केवळ एक उदाहरण ...

हौसिंग सोसायटीमधील पार्किंग : कायदे, उपविधी, नियमावली आणि सदनिकाधारकांचे अधिकार

आजच्या आधुनिक शहरी जीवनात घराइतकीच महत्त्वाची गरज म्हणजे वाहन पार्किंगची सुविधा होय. शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि मर्यादित जागा यांमुळे हाउसिंग सोसायटीमधील पार्किंग हा अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त विषय बनला आहे. पूर्वी एका कुटुंबाकडे एक वाहन असायचे; मात्र आज जवळजवळ प्रत्येक घरात दोन किंवा अधिक वाहने आढळतात. परिणामी अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगवरून सदस्यांमध्ये वाद निर्माण होतात. काही वेळा बिल्डर पार्किंग विकतो, काही सदस्य अतिरिक्त जागेवर कब्जा करतात, तर काहींना एकही पार्किंग मिळत नाही. अशा परिस्थितीत पार्किंगचे कायदेशीर स्वरूप, सोसायटीचे अधिकार, सदस्यांचे हक्क आणि लागू असलेले कायदे समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगसंदर्भातील प्रश्न हे प्रामुख्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अधिनियम, १९६३, महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अधिनियम, १९७०, रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) अधिनियम, २०१६, तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांचे नमुना उपविधी यांच्या आधारे निश्चित...